सोनार किल्ला

थरच्या वाळवंटात गेली 855 वर्षे उभा असलेला जैसलमेरचा अतिप्राचीन किल्ला सध्या अतिक्रतमणे आणि बेकायदा बांधकामांशी झुंज देत आहे. मध्ययुगीन कालखंडात सिंध आणि अफगाणिस्तान प्रांतातून होणारे हल्ले परतवणारा हा किल्ला या आक्रमणांपासून कसा वाचवावा , असा प्रश्न येथील स्वयंसेवी संस्थांना पडला आहे.
हा किल्ला पिवळी झाक असलेल्या दगडांत बांधला असल्याने चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी त्याचे नामकरण ' सोनार किल्ला ' ( सोनेरी किल्ला) असे केले होते. मात्र , या किल्ल्याची ही सोनेरी झळाळी आता पार उडून गेली आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठमोठी दुकाने , एम्पोरियम , हॉटेल उभी राहिली असून या सगळ्याच्या कचऱ्याचा भार हा शाही किल्ला वागवत आहे.
इ. स. 1212 मध्ये लोडवराच्या भाती सत्ताधाऱ्यांनी हा 99 स्तंभांचा हा किल्ला बांधला असून राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण आहे. मात्र , किल्ल्याचे बाह्यरूप सुंदर दिसत असले तरी व्यापारी संकुलातून टाकल्या जाणाऱ्या कचरा आणि प्लॅस्टिकमुळे किल्ल्याचे अंतरंग विदुप झाले आहे , असे पर्यटन व्यवसाय महासंघाचे अध्यक्ष जितेंद सिंग यांनी सांगितले.
या किल्ल्याला वाचवायचे असेल तर त्याच्यावरचा हा ताण हलका केला पाहिजे , असे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अधिकार तोकडे पडत आहेत , असेही जितेंद सिंग म्हणाले. जिल्हा परिषदेने आतापर्यंत किल्ल्याच्या संरक्षणासाठी अनेक वेळा लोकजागृतीचे प्रयत्न केले. मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही. राजस्थान सरकार , भारतीय पुरातत्त्व विभाग सवेर्क्षण विभाग आणि ' र्वल्ड वॉच मॉन्युमेंट ' ही स्वयंसेवी संस्थेतफेर् काही वर्षांपूवीर् या किल्ल्याचा जीणोर्द्धार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र , भारतीय पुरातत्त्व सवेर्क्षण विभाग आणि राजस्थान सरकारने यातील पाच कोटी रुपयांचा वाटा देण्याचे नाकारल्याने ही योजना सरकारी फडताळातच पडून राहिली आणि सत्यजित रे यांनी नावाजलेला जैसलमेरचा ' सोनार किल्ला ' बेकायदा बांधकामांचे आक्रमण झेलत राहिला.

solapur pune pravasi sangatana